Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईजुनी पेन्शनसाठी १७ लाखांच्या वर एकवटले कर्मचारी- तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी...

जुनी पेन्शनसाठी १७ लाखांच्या वर एकवटले कर्मचारी- तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- २००४ पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर १७ लाखांच्या वर कर्मचारी मंगळवार १४ मार्च म्हणजे आजपासून  बेमुदत संपावर गेले आहेत.या संपामुळे शासकीय रुग्णालये,शाळा,पंचायत समित्या,महापालिका,जिल्हा परिषदा तसेच तहसील कार्यालयांसह सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होणार झाले.तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले असून त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे.

नवीन पेन्शन योजना रद्द करणे,प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन,सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे,कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा,सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा,निवृत्तीचे वय ६० करा,नवीन शिक्षण धोरण रद्द करा,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा व इतर विविध मागण्या केल्या आहेत.

आयुष्यभर लोक काम करतात त्यामुळे त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे,असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आज विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, शेतकरी प्रश्न, किसान सभेचा लाँग मार्च या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.ही पेन्शन शेजारीच्या तीन राज्यात देण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!