Wednesday, April 15, 2026
Homeगोंदियाजंगली हत्तींचा धुमाकूळ; तीन शेतकऱ्यांवर हल्ला..

जंगली हत्तींचा धुमाकूळ; तीन शेतकऱ्यांवर हल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जंगली हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात धुडगूस घालत कुरखेडा मार्गावरून ११ मार्च २०२६ रोजी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शिरकाव केला.गुरुवार १२ मार्चच्या सकाळी हत्तींच्या कळपाचे लोकेशन गोंदिया जिल्ह्यातील केशोरी वनक्षेत्रात आढळून आले.हत्तींच्या कळपाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथील शेतशिवारातील मक्याचे पीक उद्ध्वस्त करून हत्तींनी लगतच्या जंगलात ठाण मांडले होते.११ मार्च रात्रीच्या वेळी हत्तीच्या कळपाने शेत शिवारातील उभ्या मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशातच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव बंध्या परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने मागील आठवडाभरापासून धुमाकूळ घातला आहे.परिसरातील मका पिकासह अन्य पिकाचे नुकसान केले.अश्यातच नुकतेच शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांवर जंगली हत्तींनी हल्ला केल्याने तीन शेतकरी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दयाराम घुगुसकर, आसाराम निमकर,उज्ज्वल चिंचेकर सर्व रा.वडेगाव बंध्या यांचा समावेश आहे.त्यांच्यावर केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
वडेगाव बंध्या येथील शेतकरी दोन दिवसांपूर्वी सकाळी नेहमी प्रमाणे शेतात गेले होते.शेतशिवारात हत्तींचा कळप असल्याची त्यांना कसलीच कल्पना नव्हती. दरम्यान,शेतात काम करीत असतांना अचानक हत्तींचा कळप शेतकऱ्यांवर धावून गेला आणि शेतकऱ्यांना पाठीमागून धक्का दिला.यात तिन्ही शेतकरी जखमी झाले.यावेळी जखमी अवस्थेतच शेतकऱ्यांनी पळ काढला व आपले प्राण वाचविले. घटनेची माहिती त्यांनी गावात दिली.तिन्ही जखमी शेतकऱ्यांना केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेने परिसरातील शेतकरी धास्तावले असून जंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!