Wednesday, April 15, 2026
Homeनागपूरकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज आणि आशीनगर भागात कार्यरत दोन स्वच्छता कामगारांना निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणात महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी ही शिस्तभंगाची कारवाई करीत दोन्ही स्वच्छता जमादारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक- २३ मध्ये कार्यरत सफाई कर्मचारी,प्र.स्वच्छता जमादार राजेश जुमळे आणि आशीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक- २ मध्ये कार्यरत स्वच्छता जमादार रितेश उसरबर्से अशी  निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने सर्व सहायक आयुक्त तसेच वरीष्ठ अधिका-यांद्वारे झोनमध्ये विविध ठिकाणी आकस्मिक भेट देत पाहणी केली जात आहे.या पाहणीमध्ये कर्तव्यात कसूर करीत असलेले कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. लकडगंज झोन आणि आशीनगर झोनमधील आकस्मिक पाहणीमध्ये प्र.स्वच्छता जमादार राजेश जुमळे आणि स्वच्छता जमादार रितेश उसरबर्से हे दोघे कर्तव्यात कसूर करताना आढळून आले.त्यामुळे त्यांच्यावर नियमान्वये कारवाई करण्यात आली आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!