- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-नुकतेच तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील ३५ वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या कारणावरून मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता आणखी एकाने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता व आपल्या दोन मुलींचे पुढे काय होणार? या विवंचनेतून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सदरची घटना बीड जिल्ह्याच्या नाथापूर गावात काल शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.गोरख नारायण देवडकर वय ५० वर्षे असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून गोरख देवडकर यांना पाच मुली आहेत.तीन मुलींचे लग्न झाले,त्यापैकी दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा वाढून आपल्या मुलींना नोकरी मिळेल कशी?असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून सोडत होता.त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलींसोबत संवाद साधून खंत व्यक्त केली होती आणि त्याच रात्री जीवनयात्रा संपवील्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या कारणावरून राज्यातील ही दुसरी घटना असल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

