Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचे सावट…

ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचे सावट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- दिवाळी अगदी तोंडावर आली आहे.यामुळे सर्व घराघरांमध्ये लगबग सुरू झाली आहे.फराळाची तयारी सुरू झाली असून किराणा साहित्य आणण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करू लागले आहेत.असे असले तरी यंदा मात्र दिवाळीच्या उत्साहाला महागाईची झळ बसली आहे.विशेषतः खुसखुशीत,चमचमीत खमंग फराळाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.मैदा,रवा, साखर,गूळ,पोहे,तेल,खोबरे,बेसन यासह तूप या सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांची गोची होत आहे.ऐन सणासुदीत वाढत्या महागाईने डोके वर काढले.तथापि,दिवाळी सारखा सण असल्याने त्यांना प्राप्त परिस्थितीत कसातरी सण साजरा करावा लागेल. दरवर्षी दिवाळी आली की गृहिणी अधिक तयारी करतात ती फराळाची.लाडू,करंजी,अनारसे,चकली,चिवडा,शंकरपाळ्या असे अनेक पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच दिवाळी जवळ आली की सर्वांच्या घरातून खमंग सुगंध दरवळण्यास सुरुवात होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फराळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य १५ ते २० टक्क्यांनी अधिक महागले आहे.ऐन दिवाळीत वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!