Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून सिकलसेल नियंत्रण सप्ताह.. - नियमित व विशेष गाव निहाय,शाळानिहाय सह इतर...

उद्यापासून सिकलसेल नियंत्रण सप्ताह.. – नियमित व विशेष गाव निहाय,शाळानिहाय सह इतर लाभार्थ्यांची होणार तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबवला जाणार आहे.यामध्ये नियमित व विशेष गाव निहाय, शाळा निहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे.  सध्या जिल्ह्यात एकूण ४१ हजार २५८ सिकलसेल वाहक आणि २ हजार ९७८ सिकलसेल ग्रस्त रुग्ण आहेत.यामध्ये सिकलसेल ग्रस्त रुग्णांचे सिकलसेल क्रायसिस,तीव्र रक्ताशय व आवश्यक आरोग्य तपासणीसाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.
सिकलसेल ग्रस्त रुग्णांना क्रायसिस होऊ नये आणि वारंवार रक्त लावण्याची गरज पडू नये म्हणून हैड्रोक्सियूरिया हे औषध सर्व रुग्णांना सुरु करण्याचे ध्येय आहे.सध्या जिल्ह्यात एकूण ९२९ रुग्णांना हैड्रोक्सियूरिया हे औषध सुरु केले असून त्यांच्या आरोग्यात उत्कृष्ट असा बदल झाला आहे.याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्व गरोदर स्त्रियांची प्रसूतीदरम्यान सिकलसेल तपासणी आणि ज्या स्त्रिया वाहक किंवा रुग्ण आढळल्यास त्यांच्या पतींची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे.जेणेकरून सिकलसेल असलेले जोडप्याचे २० आठवड्याच्या आत गर्भजल चाचणी करून होणारे अपत्य हे सिकलसेल रुग्ण तर नाही? हे जाणून घेता येते व ते जोडप्यांना गर्भपातासाठी समुपदेशन करून टाळता येते.यासाठी जिल्ह्यात संकल्प फाऊंडेशन आणि क्र्सना डॅग्नोस्टिकस कार्यरत आहेत.
ऑक्टोंबर २०१८ पासून जिल्ह्यात एकूण ११ हजार ५४९ गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे. त्या पैकी १२६ स्त्रिया या सिकलसेल वाहक म्हणुन  व १७ जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले. अश्या सर्व १७ स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात आली आहे.या १७ पैकी ३ स्त्रियाच्या तपासणीत होणारे अपत्य हे सिकलसेल रुग्ण आढळून आले आणि त्या पैकी २ जोडप्यांना होणारे अपत्य सिकलसेल रुग्ण होऊ नये व त्यांनी आयुष्यभर यातना सोसू नये म्हणून वैद्यकीयरित्या गर्भपात केले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात नवीन जन्माला येणारे बाळ सिकलसेल आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व आरोग्य संस्थावर सिकलसेल वाहक असलेल्या जोडप्यांची गर्भजल तपासणी सुरु करण्यात येत आहे.
नवजात बालकाला सिकलसेल आजार तर नाही?यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नवजात बालकाचे जन्माच्या ७२ तासामध्ये तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी हिंद लॅब मार्फत प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर सुरु करण्यात येत आहे.सन २०२३ पासून एकूण ८८५९ नवजात बालकांची तपासणी करण्यात आली आहे आणि येत्या काळात सर्वच नवजात बालकाची तपासणी प्रत्येक आरोग्य संस्थांवर करण्यात येईल,असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.
तसेच सिकलसेल हे आजार पुढच्या पिढीत होऊ नये म्हणुन लग्नापूर्वी तपासणी आणि २ सिकलसेल आजाराच्या वाहकांचे लग्न होऊ नये म्हणुन प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर आरोग्य कर्मचारी हे समुपदेशन करीत आहेत.उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप  स्थापन करण्यात आला आहे; जेणेकरून सर्व सिकलसेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीचा नियम औषदाशीत,आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येईल.जिल्ह्यात सिकलसेलचे नवीन रुग्ण होऊ नये व असलेल्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग तत्पर आहे.हा कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रांसाठी PATH आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याची माहिती जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!