Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीआता अडचणी,तक्रारीसाठी 'आपला मित्र' व्हाट्सअप सेवा..

आता अडचणी,तक्रारीसाठी ‘आपला मित्र’ व्हाट्सअप सेवा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विचार करता समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘आपला दोस्तालू/आपला मित्र’ हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमांतर्गत विभागाने ९४२३११६१६८ (9423116168)हा व्हाट्सअप क्रमांक सुरू केला आहे.नागरिकांना योजनांची माहिती, कागदपत्रांसंबंधी मदत,शासकीय सुविधांची माहिती तसेच अडचणी व तक्रारी यासाठी थेट वरील व्हाट्सअप क्रमांकावर संदेश पाठवता येईल.
सिरोंचा,भामरागड,एटापल्ली,कोरची यांसारख्या अतिदुर्गम भागांतील नागरिकांना आता समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज नाही.या उपक्रमामुळे दूरदराजच्या भागातील नागरिकांचा वेळ,पैसा आणि प्रवासाचे श्रम वाचणार असून,समाज कल्याणाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे.
‘आपला मित्र’ ही सेवा समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!