Saturday, April 18, 2026
Homeनागपूरआगीचे रौद्ररूप; लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी धावा..!

आगीचे रौद्ररूप; लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी धावा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सिंथेटिक पाईप जवळच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केल्याची घटना आज,सोमवार २ मार्च रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील नरसाळा परिसरातील चाणक्यपूरम परिसरात घडली.सदरची आग लोकवस्तीपर्यंत पोहचणार तोच मदतीसाठी वेळीच धावा केल्याने मोठा अनर्थ टळला.यात जीवितहानी टळली असली तरीही तब्बल ७०० सिंथेटिक पाईप जळून खाक झाल्याने कंत्राटदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नरसाळा परिसरातील एका पाण्याच्या टाकीखाली मोठ्या प्रमाणात सिंथेटिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते.आज सोमवारी सकाळी या पाईप जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली.सदरची आग वेगाने पसरत पाईप ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पोहचली आणि पाईपवरील रबराच्या आवरणामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांतच परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट पसरले.तब्बल अर्धा तास परिसरात धुराचे साम्राज्य असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लागलीच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले.घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांत अग्निशमन दलाचे तीन वाहन पथकासह घटनास्थळी दाखल झाले.युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.सदरची आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून सर्वप्रथम कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून ती हळूहळू पसरत जाऊन आगीने रौद्ररूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे वा कुणीतरी जाणून बुजून आग लावली असावी,अशी शक्यता नाकारता येणार नाही,अशी शंका परिसरातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!