Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीपोलीस तपासानंतर प्रकरणाला आले वेगळे वळण... -वृध्द पती-पत्नीची हत्या करणारे निघाले घरचेच...

पोलीस तपासानंतर प्रकरणाला आले वेगळे वळण… -वृध्द पती-पत्नीची हत्या करणारे निघाले घरचेच…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी येथे गोटा दाम्पत्याची निघृण हत्या करून नदीपात्रात फेकले होते.या प्रकरणात चौकशीसाठी पाच नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले होते.मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात गोटा दाम्पत्याचे तीन पुतणेच त्यांचे मारेकरी असल्याचे उघड झाले.त्या तिघांना एका सहकाऱ्याने मदत केली होती.चारही आरोपींना काल,शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोज गोटा वय २८ वर्षे,शंकर गोटा वय २५ वर्षे, देवाजी गोटा वय ३० वर्षे,रामसू नरोटी वय ३० वर्षे सर्व रा.कांदोळी,तालुका एटापल्ली,अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.मनोज,शंकर आणि देवाजी हे गोटा दाम्पत्याचे पुतणे आहेत.तर रामसू हा त्यांचा सहकारी आहे.करपनफुंडी येथील महिला बुर्गो रैनू गोटा वय ५५ वर्षे व रैनू जंगली गोटा वय ६० वर्षे हे दाम्पत्य २४ ऑगस्टपासून घरून बेपत्ता होते.पत्नी बुर्गों गोटा यांचा मृतदेह २७ ऑगस्टला बांडे नदीत आढळला तर रैनू गोटा यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीत आढळला होता.मृतक रैनू जंगली गोटा हा पुजाऱ्याचेही काम करीत होता.त्यामुळे त्याची हत्या जादूटोण्याच्या संशयातून झाली असावी; असा पोलिसांचा कयास होता; मात्र, तपासानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले.मृतक रैनू व बुर्गो यांना ६ मुले व २ मुली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!