- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- न्यायाच्या समोर कुठल्याही गुन्हेगाराला थारा नाही.गुन्हा कुठलाही असो,शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो.यात खंडणी वसूल करणे,धमक्या देणे,विनयभंग, अश्लील चाळे,अत्याचार,मारझोड,हत्या व इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.असाच प्रकार नागपूर शहरात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या पत्रकाराच्या बाबतीत उघडकीस आला आहे.आरटीओ दलालाची बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या दैनिक भास्करचा शहर संपादक सुनील हजारी याच्याशी संबंधित लोकांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.हजारीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.२९ ऑगस्ट रोजी दुपारी सदर पोलिसांनी सुनील हजारीला आरटीओ एजंट धनराज उर्फ टिटू शर्मा यांच्याकडून ८० हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले होते.बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन हजारी पैसे उकळत होता.शर्मा यांच्याकडे त्याने १० लाख रुपये मागितले होते. सुरुवातीला सात लाख रुपये आणि नंतर तीन लाख रुपये देण्यास सांगितले.एक लाखाचा पहिला हप्ता २८ ऑगस्ट रोजी मेडिकल चौकात घेण्यात आला.एक लाखाचा दुसरा हप्ता २९ ऑगस्टला देण्याचा निर्णय झाला. दरम्यान,हजारीला व्हीसीए चौकातील आइस्क्रीम पार्लरमध्ये ८० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून हजारीला अटक केली. सदर पोलिसांनी त्याला आज न्यायालयात हजर केले.पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की,हजारी व्यतिरिक्त इतर पत्रकार,वरिष्ठ संपादक आणि त्यांच्यासोबत काम करणारे बदनामीची भीती दाखवत, वेगवेगळ्या विभागांत नियुक्त केलेल्या लोकांकडून पैसे उकळत असल्याचे आढळून आले आहे.या संदर्भात हजारीची चौकशी करावी लागेल. हजारीच्या खंडणीच्या कृत्यात इतर लोकांचीही मदत असण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली आहे; त्यांचाही शोध घ्यावा लागेल. पोलिस कोठडी नसताना हजारी साक्षीदारांवर प्रभाव टाकून पुरावे नष्ट करू शकतो.त्यामुळे त्याची कोठडी आवश्यक आहे. हजारीने २८ ऑगस्ट रोजी शर्मा यांच्याकडून एक लाख रुपये घेतले होते.याबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिलेले नाही.उलट तपासणीनंतर न्यायालयाने हजारीला १ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
- Advertisement -

