Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या.. -काँग्रेस नेते...

देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या.. -काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात सतत चार दिवस संततधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित होऊन काहींची घरे पडली तर काहींच्या घरात पाणी शिरून संपूर्ण घर जलमय झाल्याने लोकं चिंतातुर झाले आहेत.अशातच जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून शेतात पऱ्हे टाकले.पऱ्हे टाकून धान रोवणी केली.मात्र,धान रोवणी होताच पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे.शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्यामुळे महसूल प्रशासन विभागाने पडझड झालेल्या घरांची तसेच शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी नेते तथा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यासह इतरही तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रामदास मसराम व मित्र परिवार यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची दिनांक-२२ जुलै व २३ जुलै रोजी संपूर्ण तालुक्याच्या गावातील शेतकऱ्यांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली.पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व महसूल प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ 

 शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुरामुळे शेतातील धानपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे पंचनामे करून याद्याही तयार करण्यात आल्या.मात्र,तालुक्यातील  नुकसानीची १ कोटींच्यावर शेतकऱ्यांची रक्कम अजूनही मिळाली नाही.त्यामुळे मागील वर्षी व यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे; अशांना सरसकट त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी रामदास मसराम व मित्र परिवार यांनी केली आहे.

नुकसानीची पाहणी करतांना शेतकरी तथा काँग्रेस नेते रामदास मसराम,माजी देसाईगंज पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी देसाईगंज पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सागर वाढई हितेश तुपट,जावेद शेख,स्वप्नील मिसार,गौरव शिलार व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!