Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशून्य इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे..! घ्या जाणून..

शून्य इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे..! घ्या जाणून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आयकर रिटर्न (ITR) भरण्याची वेळ आता जवळ येत असून इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर) बाबत अनेकांना असे वाटते की करपात्र उत्पन्न नसेल तर त्यांना रिटर्न भरण्याची गरज नाही.आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे; त्यामुळे आयकर विभागाने करणदात्यांना कोणताही विलंब न करता लवकरात लवकर रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे.दरम्यान,करपात्र उत्पन्न असेलेले आयटीआर भरण्यापासून बहुतेक लोक परिचित आहेत; परंतु आयकर कायद्यात शून्य किंवा Nil रिटर्न फाईल करण्याचीही तरतूद आहे.

जर एखाद्या करदात्याने वार्षिक एकूण उत्पन्न करपात्र नसेल तर त्याने Nil किंवा शून्य आयटीआर फाईल करावा.Nil आयटीआर भरून तुम्ही आयकर विभागाला आपल्या उत्पन्नाची माहिती देणे अनिवार्य आहे.एखाद्या करदात्याची वार्षिक कमाई २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याच्यावर कोणतेही करदायित्व नाही.

वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर आयकर रिटर्न दाखल करण्याची गरज नाही; असा बऱ्याच लोकांचा समज आहे; पण तसे नाही.वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर एक रुपयाही कर भरावा लागत नाही कारण आयकर कायद्याच्या कलम ८७ए अंतर्गत १२,५०० रुपयांची सूट मिळते तर सूटची वास्तविक मर्यादा आता अडीच लाख रुपये आहे.

एखादा करदाता रिफंडचा दावा करण्यासाठी शून्य रिटर्न दाखल करू करतो.एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असण्याच शक्यता आहे; परंतु फॉर्म १५H/G सबमिट करण्यास विसरल्यामुळे बँकेने व्याजातून TDS कापला गेला असेल तर तुम्ही कपात केलेल्या कराचा दावा (रिफंड) करण्यासाठी शून्य रिटर्न दाखल करू शकता.

तुमचे कोणतेही उत्पन्न करपात्र नसले तरीही शून्य किंवा Nil आयकर रिटर्न दाखल केल्यास कर नियमांचे पालन केल्याची खात्री होते.यामुळे कर्ज, व्हिसा किंवा उत्पन्नाचा पुरावा आवशयक असलेल्या इतर आर्थिक व्यवहारांसाठी अर्ज करताना तुमच्या पथ्यावर पडू शकते.याशिवाय एखाद्या बँकेत कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी कर्ज केला आणि बँकेने उत्पन्नाचा पुरावा मागितले तर तुम्ही भरलेल्या शून्य म्हणजे Nil आयटीआर उत्पन्नाचा पुरावा म्हणून जमा करू शकता.शून्य ITR भरण्याचा अजून एक फायदा म्हणजे स्वतःच्या नावावर असलेली एखादी जमीन किंवा घर तुम्ही सहज विकता येते.

अशाप्रकारे शून्य ITR दाखल करून कोणतेही नुकसान होत नाही; पण नक्कीच अनेक फायदे मिळतात.विशेषत: तुम्हाला कधी अचानक गरज भासली आणि लाखभर रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर झिरो आयटीआर तुमच्या खूप उपयुक्त ठरू शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!