Tuesday, June 23, 2026
Homeलाखांदूररोजगार हमीचे काम करतांना मजुराला आली भोवळ..-  उपचारा पूर्वीच मजुराचा आकस्मिक मृत्यू…

रोजगार हमीचे काम करतांना मजुराला आली भोवळ..-  उपचारा पूर्वीच मजुराचा आकस्मिक मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

लाखांदूर(भंडारा) :- रोजगार हमी योजने अंतर्गत शेत शिवारात मातीकाम करीत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला.ही घटना काल,१९ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव शेत शिवारात घडली.रामचंद्र सखाराम ब्राह्मणकर वय ५६ वर्षे असे मृत मजुराचे नाव आहे.

लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात मागील काही दिवसांपासून शासनाच्या मग्रारोहयोच्या अकुशल कामांतर्गत शेतशिवारात मातीकाम सुरू करण्यात आले आहे.या माती कामावर रामचंद्र स्वतःच्या कुटुंबीयांसह नियमित मजूर म्हणून काम करीत आहे.रविवारला रामचंद्र सकाळच्या सुमारास  काम करीत असतानाच अचानक रामचंद्रला भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला.यावेळी रामचंद्रच्या कुटुंबीयांसह शेतशिवारात उपस्थित अन्य मजुरांनी रामचंद्रला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात  हलविले.डॉक्टरांनी उपचारा पूर्वीच रामचंद्रला मृत घोषित केले.

मजुराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक सोनेगाव ग्रामपंचायतचे सरपंच नरेश कठाणे, ग्रामसेवक लांजेवार,रोजगार सेवक नाहोकर यांच्यासह लाखांदूर पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना होताच सर्वांनी मृतकाच्या घरी भेट दिली.यावेळी कुटुंबीयांना मजुराच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याबाबत सांगितले.मात्र, कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्याला विरोध केला.परिणामी,मृत्यूचे कारण कळले नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!