Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया,चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० राईस मिल बंद अवस्थेत…..-इतर राज्यांप्रमाणे दर...

गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया,चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० राईस मिल बंद अवस्थेत…..-इतर राज्यांप्रमाणे दर ठरवण्याची राईस मिल मालकांची मागणी…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० राईस मिल बंद आहेत.अशातच यावर्षी शासनाने शेतकऱ्यांकडून कोट्यवधी क्विंटल धान खरेदी केले आहे.मात्र खरेदी करण्यात आलेला धान उघड्यावर पडून आहेत.राईस भरडाई करण्यास तयार नसल्याने धान्याची नासाडी होत आहे.राईस मिल बंद असल्याने मजूर,वाहतूकदार आणि गिरण्यांशी संबंधित नागरिक बेरोजगार होऊन उपासमारीची पाळी अनेकांवर आली आहे.अशातच स्थानिक तसेच इतर नागरिकांना रोजगाराभिमुख जास्तीत-जास्त रोजगार देणारा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात फक्त तांदूळ उद्योग आहे; अशा परिस्थितीत सरकारने यावर तोडगा  लवकरात लवकर तोडगा काढून विचार करणे आवश्यक आहे.

राईस मिल व मिलर्सची मागील ३ वर्षांची थकबाकी तसेच वाहतूक बिले शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे उद्योगा करीता बँकांकडून कर्ज घेणाऱ्या राईस मिल मालकांना आता बँका त्रास देत आहेत.त्यामुळे काही राईस मिल मालकांना कर्जपायी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.एमएसपीमुळे संपूर्ण धान्या शासन खरेदी करते.मिलरला सदर धान गिरवावा लागतो आणि सरकारला तांदूळ द्यावा लागतो, मिलर्सने दिलेला तांदूळ रेशन दुकानातून गोर-गरीब जनतेला दिला जातो.शेजारच्या मध्य प्रदेशात २०० रुपये आणि छत्तीसगडमध्ये १२० रुपये प्रति क्विंटल दराने मिलिंग मिळते आणि महाराष्ट्रात त्याचा दर फक्त १० रुपये प्रति क्विंटल आहे.ज्यामध्ये मिलरला एक क्विंटलच्या बदल्यात ६७ टक्के तांदूळ द्यावा लागतो.धानाची हमाली,वीजबिल आणि इतर खर्च असे सरकारी नियमानुसार आहे.शेजारील राज्याप्रमाणे आम्हालाही  दर देण्यात यावा; अशी मागणी गिरणीधारक महाराष्ट्र सरकारकडे वारंवार करीत आहेत; परंतु याकडे शासन लक्ष घालीत नसल्याने महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांप्रमाणे जास्तीचे दर देण्यात यावे; अशी मागणी महेश अग्रवाल,आकाश अग्रवाल,दिशुलाल काबरा आणि इतर राईस मिलर्स करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!