Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना....!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय...

बँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना….!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय करतात? घ्या जाणून…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या परिस्थितीत असा एकही व्यक्ती सापडणार नाही की,ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही.लहानांपासून तर वयोवृद्ध यांची बँक खाती असतातच.बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित मानले जाते. काबाळकष्ट करून व पोटाची आतडी मारून लोक बँकेत पैसा ठेवतात.अशातच काहीजण बँकेत तर पैसा ठेवतात; मात्र त्यांना माहितीच नसते किंवा आठवण येते किंवा नाही की,आपला बँकेत पैसा आहे.कितीतरी वर्षे उलटूनही काहीजण ठेवलेल्या पैशाला हात लावत नाही.अशीच बाब निदर्शनास आली असून नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम ३५ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फेब्रुवारी मध्ये दिली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी संसदेत दिली आहे.

खरे म्हणजे असे पैसे ज्यांच्यावर कुणीही दावा केलेला नाही.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला लिखित स्वरुपात ही माहिती दिली.सदर ३५,०१२ कोटी रुपयांचा कोणीही दावेदार नसलेली सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेत आहे.स्टेट बँक ऑफ इंडियात असे ८,०८६ कोटी रुपये आहेत.तर पंजाब नॅशनल बँकेत असे ५,३४० कोटी रुपये आहेत. कोणीच दावा न केलेले ४,५५८ कोटी रुपये कॅनरा बँकेमध्ये आहेत तर बाकीची. रक्कम इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बचत आणि चालू खात्यात असलेल्या रकमेबद्दल १० वर्षे कोणीही विचारणा न केल्यास ती रक्कम ‘दावा न केलेली रक्कम’ मानली जाते. अनेक जण बँकेत ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतात. त्याला मुदत ठेव मानले जाते.ठराविक कालावधी संपल्यानंतर १० वर्षांनंतरही त्या रकमेवर दावा करण्यास कोणीही पुढे न आल्यास त्या रकमेला ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ समजले जाते.सदर रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयनेस फंडा’त जमा केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!