- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.तर छाननीनंतर राज्यातील तब्बल ८० लाख ७१ हजार ९५२ महिला अपात्र ठरल्याने अश्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे.विशेष म्हणजे,सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४७ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यानुसार,कागदपत्रांची व अर्जांची छाननी केल्यानंतर अनेकजण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरले. अश्यातच २४ लाख महिलांनी अर्जात चुकीने स्वतःची नोंद ‘शासकीय कर्मचारी’ केली होती; त्यामुळे सुरुवातीला त्या अपात्र ठरल्या होत्या.राज्य सरकारने चूक दुरुस्त करण्यासाठी ई-केवायसीसाठी वारंवार मुदत दिली होती. या कालावधीत २४ लाखांपैकी २० लाख महिलांनी आपली नोंद दुरुस्त करून पूर्ववत पात्रतेचा लाभ मिळवला,तर उर्वरित चार लाख महिला निकषांत न बसल्याने कायमच्या अपात्र ठरल्या.आता लाभार्थी महिलांची संख्या १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ निश्चित झाल्याने सरकारचा महिन्याचा प्रत्यक्ष खर्च २ हजार ४५९ कोटी रुपये इतका होणार आहे.यामुळे राज्य शासनाची वार्षिक सुमारे १२ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.महत्वाचे म्हणजे,नियमांनुसार ज्या लाभार्थी महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण होणार,अश्या महिला आपोआप योजनेतून बाहेर पडतील.तसेच ज्या महिलांना जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा झालेत,अश्या पात्र लाभार्थी महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा यापुढे नियमित लाभ मिळेल.
- Advertisement -

