Sunday, June 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल ९० लाख ८५ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १ हजार ८१७ कोटीची रक्कम जमा झाल्याचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी म्हटले.शनिवार २० जून रोजी
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भरणे कार्यक्रमात सहभागी झाले होते.केंद्राने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना सुरू केली आहे.अश्यातच पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालच्या हुगळीतील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला.पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दोन हजार रुपये प्रमाणे थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होते. खात्यात २३ वा हप्ता थेट जमा झाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्यात पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे ४१ हजार ८३ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!