Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक आज,बुधवार १० जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
देसाईगंज रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ मार्गावर मोठे खड्डे पडले असून,पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अपघाताची शक्यता तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी सदर अंडरपासच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कालावधीत प्रवासी बसेस,पाणीपुरवठा, महावितरण दुरुस्ती,रस्ते दुरुस्ती आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई असेल.नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८,भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील प्रचलित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटली; दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटून दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार...

३० हजाराची लाच भोवली; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असतांनाच नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज,बुधवार १० जून रोजी धडक कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य...

घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर; ९९.४६ टक्के नोंदी पूर्ण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताच्या जनगणना-२०२७ अंतर्गत सध्या राज्यभर घर-यादी गणना मोहीम राबविण्यात येत आहे.१० जून २०२६ रोजीच्या आढावा अहवालानुसार राज्यात सरासरी १३.१७ टक्के घर-यादी...

पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होतांना दिसत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – प्रधानमंत्री यांच्या दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने केले अभिनंदन..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!