Monday, July 27, 2026
Homeनागपूरसहलीच्या आनंदावर विरजण; तिघांचा नदीत बुडून मृत्यू..

सहलीच्या आनंदावर विरजण; तिघांचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मोठ्या आनंदात कौटुंबिक सहलीचा बेत आखला आणि दिवस ठरला तो सुट्टीचा.पण,क्षणातच कौटुंबिक सहलीच्या आनंदावर विरजण पडल्याची दुःखद घटना आज,रविवार ७ जून रोजी दुपारच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या कामठी परिसरातील कन्हान नदी पात्रात घडली.घडलेल्या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.चैतन्य बबलू अंबादे वय ६ वर्षे,रा.इंदिरा नगर, जरिपटका,नागपूर,गौतम राजकुमार अंबादे वय ३१ वर्षे रा.जरिपटका,नागपूर व रोहित नागदेवे वय ३३ वर्षे, रा.कुंभारे कॉलनी,कामठी,नागपूर अशी कन्हान नदी पात्रात बुडून मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत.हे तिघेही एकाच कुटुंबातील सदस्य होते. नागपूरच्या जरिपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा नगर येथील नातेवाईक असलेले अंबादे आणि नागदेवे हे कुटंब आज रविवारची सुट्टी असल्याने कौटुंबिक सहलीसाठी जुनी कामठी पोलीस हद्दीच्या सैन्य दलाच्या परिसरातील शिवमंदिर परिसरात गेले होते.शिवमंदिर कन्हान नदीच्या पात्राला लागूनच आहे.दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. याच दरम्यान,जरीपटका येथील केजी एक मध्ये शिकणारा सहा वर्षीय चिमुकला चैतन्य अंबादे हा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी उतरला.खेळता-खेळता त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडू लागला. चैतन्यला बुडतांना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा काका गौतम अंबादे यांनी पाण्यात उडी घेतली.मात्र, गौतमला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला.सदरचा प्रकार जवळच उभे असलेल्या रोहित नागदेवे यांच्या लक्षात येताच त्यांनीही दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.पण,खोल पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित नागदेवे यांचाही बुडून मृत्यू झाला.नदीकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या इतर लोकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत मदतीचा प्रयत्न केला,परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच जुना कामठी पोलीस ठाण्याचे एपीआय मनीष हिवरकर आणि पीआय सागर भंडारी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या पात्रात उतरून शोधमोहीम राबवली व तिन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.त्यानंतर,मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!