Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त..अन्यथा पीएम किसानचा लाभ होणार बंद; ३० जून शेवटची तारीख..

..अन्यथा पीएम किसानचा लाभ होणार बंद; ३० जून शेवटची तारीख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास पात्र लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणे बंद होऊ शकतात.त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी तात्काळ विहित मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी.यासाठी शासनाने येत्या,३० जून २०२६ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे; अन्यथा विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा,हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी शेतकरी नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊ शकतात.तसेच,शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून चेहऱ्याद्वारे(फेस ऑथेंटिकेशन) ई-केवायसी पूर्ण करू शकतील.पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी,असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!