Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीमोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. - पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे “Extremely Severe Alert” म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर सूचना म्हणून प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज,मंगळवार २६ मे रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी प्राप्त झालेल्या संदेशात “पुढील २४ तासांत अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,वर्धा या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी रात्र उष्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.गेल्या आठवडाभरापासून सूर्यदेव विदर्भावर कोपल्याचे चित्र आहे.११ पैकी ९ जिल्ह्यांतील नागरिक उष्ण लाटेचा सामना करीत असून उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पुढे आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरीत काल सोमवारी पारा ०.४ अंशाने वाढून ४७.६ अंशावर पोहोचला असून सलग दुसऱ्याही दिवशी हे शहर देशात सर्वात तापदायक ठरले आहे.  नागपूर व इतर पाच जिल्ह्यांत दिवसाचे तापमान ४६ अंशाच्यावर नोंदविण्यात आले.सोमवारी नागपूरचा पारा १.१ अंशाने वाढून थेट ४६.५ अंशावर उसळला असून ब्रम्हपुरीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे.याशिवाय भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा शहरांचे तापमानही एकपेक्षा अधिक अंशाने वाढून ४६ अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात आले आहे.दुसरीकडे अकोला, अमरावतीचा ४५ अंशाच्यावर आणि यवतमाळ ४४.४ अंशावर असून उष्ण लाटेच्या प्रभावात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये,पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!