Tuesday, July 7, 2026
Homeवर्धाअज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट नजीक महामार्गावरील हॉटेल सगुना कारखान्याजवळ घडली.मृतांमध्ये पती,पत्नी आणि त्यांच्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गजानन वानखेडे वय ४५ वर्षे,पल्लवी गजानन वानखेडे वय ३८ वर्षे व आरोही वानखेडे वय ६ वर्षे अशी मृतकांची नावे असून वानखेडे कुटूंबीय वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी होते.
वानखेडे कुटूंबीय आज सकाळच्या सुमारास एमएच ३२ एएम १६९४ क्रमांकाच्या मोपेड स्कूटीने हिंगणघाट शहराकडे कपडे खरेदी करण्यासाठी निघाले होते. दरम्यान,राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांनाच हॉटेल सगुना कारखान्याजवळ विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकी चक्काचूर तर झालीच,पण दुचाकीवरील गजानन,पल्लवी व चिमुकली आरोही हे तिघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले.तिघांनाही गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तात्काळ रुग्णवाहिका बोलवून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती तिघांनाही मृत घोषित केले. अपघातात मृत पावलेली चिमुकली आरोही ही जुळी बहीण होती.दुसरी जुळी बहीण घरीच राहिल्याने ती बचावली.मात्र,अख्खे कुटुंबच अपघातात मृत पावल्याने आई-वडिलांविना ती पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!