Friday, May 22, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक भयंकर घटना आज,शुक्रवार २२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केले आहे.सदरची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली.वाघाच्या हल्ल्यात संगीता संतोष चौधरी वय ३६ वर्षे,सुनीता कौशिक मोहुर्ले वय ३३ वर्षे,कवडूबाई दादाची मोहुर्ले वय ४५ वर्षे व अनुबाई दादाजी मोहुर्ले वय ४६ वर्षे अशी मृतक महिलांची नावे आहेत.विशेष म्हणजे,मागील वर्षाच्या १० मे २०२५ रोजी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा(माल)येथील जंगल परिसरात वाघाने तब्बल तीन महिलांचा बळी गेला होता.त्यानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
गुंजेवाही येथील १३ महिला तेंदूपाने तोडण्यासाठी
जंगलात गेल्या होत्या.तेंदूपाने तोडत असतांनाच सकाळी ९ वाजेच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर अचानकपणे हल्ला चढवला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या.अश्यातच चार महिलांवर वाघाने झडप घातली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.इतर महिलांपैकी एक महिला ओरडतच गावात गेली आणि तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला.वाघाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये,तसेच जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.घटनेने चौधरी व मोहुर्ले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गुंजेवाही गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!