Tuesday, July 7, 2026
Homeनागपूरअनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

अनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर आणि काटोल मार्गावरील मोवाड गावाकडे विटा भरून जाणाऱ्या एका आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक पलटी होऊन तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला,तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,मंगळवार १९ मे रोजी सावनेर तालुक्याच्या ईसापूर(झिल्पा) गावाजवळ घडली.लीलाधर विष्णूजी वालूलकर वय ४० वर्षे,अजित निलकंठ भलावी वय ४० वर्षे व संजय सुदामजी कनेरे वय ४४ वर्षे अशी मृतकांची नावे असून हेमराज लक्ष्मण कन्हेरे आणि सुभाष जयराम धुर्वे आणि राजेंद्र राजगुरू अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्वजण नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्याच्या मोवाड गावचे रहिवासी आहेत.
आज मंगळवारी दुपारच्या सुमारास एमएच २३ एयू ३२३५ क्रमांकाच्या आयशर ट्रकमध्ये विटाभरून सहा मजूर व ट्रक चालक मोवाड गावाकडे जाण्यासाठी निघाले होते.उन्हाची तीव्रता लक्षात घेता मजूर केबिनमध्ये झोपलेले होते.दरम्यान,ईसापूर(झिल्पा) गावाजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.यात ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला,तर तिघेजण गंभीर जखमी झाले.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.यावेळी ट्रक चालक तथा मालक प्रवीण उर्फ गोलू बले रा.मोवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. काटोल पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१,१२५(अ),१०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार रणजीत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!