Wednesday, May 13, 2026
Homeमुंबईदहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह राज्यातील ४० पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून,तब्बल ५३ संशयितांची चौकशी सुरू आहे.आज बुधवारी सकाळपासूनच एटीएसच्या पथकांनी मुंबई,पुणे,नाशिक,जळगाव,अकोला,नांदेड, नागपूर,भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी छापे टाकले. विशेष म्हणजे,भट्टी आणि त्याच्या सिंडिकेटच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींविषयी दहशतवादविरोधी पथकाकडे विशिष्ट माहिती होती.राज्यभरातून अशा ५३ व्यक्तींची ओळख पटवण्यात आली असून,त्यांच्या ठिकाणांचा शोध घेऊन चौकशी सुरू आहे.गेल्या आठवड्यात तपासकर्त्यांना असे आढळून आले की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने शहजाद भट्टी मॉड्यूलशी संबंधित कार्यकर्त्यांमार्फत दिल्लीतील एका ऐतिहासिक मंदिरावर,दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एका प्रसिद्ध ढाब्यावर आणि हरियाणामधील एका लष्करी छावणीवर हल्ल्यांची योजना आखली होती.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्या ‘गँग बस्ट ऑपरेशन २.०’ अंतर्गत विविध राज्यांमधून अटक केलेल्या या मॉड्यूलच्या नऊ कथित हस्तकांच्या चौकशीदरम्यान हे खुलासे समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी अलीकडेच ५ ते ७ मे दरम्यान राष्ट्रीय राजधानी, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या समर्थक नेटवर्कला लक्ष्य करून राबवलेल्या ४८ तासांच्या मोहिमेदरम्यान,भट्टीशी संबंधित नऊ कार्यकर्त्यांसह ४८२ कथित गुंड आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. आरोपींना उत्तर भारत आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचे काम सोपवण्यात आले होते.त्यांच्यापैकी काही जण शहजाद भट्टी नेटवर्कसाठी शस्त्रांच्या तस्करीमध्ये कथितरित्या सामील होते.शहजाद भट्टी हा परदेशात बसून आपली टोळी चालवतो.तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.दरम्यान,एटीएस पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी येथील एका विद्यार्थ्याची चौकशी केली.संबंधित विद्यार्थी मूळचा अहेरी येथील रहिवासी असून शिक्षणासाठी सध्या गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे.सोशल मीडियावर काही संशयित अकाउंट्सशी त्याचा संपर्क असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर नागपूर येथील एटीएस पथकाने त्याची चौकशी सुरू केली.तपासादरम्यान विद्यार्थ्याच्या मोबाईलमधील सोशल मीडिया अकाउंट्स,संपर्क तसेच ऑनलाइन हालचालींची पडताळणी करण्यात आली.विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित अकाउंट्स फॉलो केल्यामुळे एटीएस सतर्क झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याचे कोणत्याही गुन्हेगारी किंवा राष्ट्रविरोधी घटकांशी संबंध आहेत का,याचा सखोल तपास करण्यात आला.त्याचबरोबर,भंडारा शहरातील मोठाबाजार परिसरात नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून शहरातील एका मोबाईल शॉपमधील कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संबंधित तरुण एका मोबाईल विक्रीच्या दुकानात काम करतो.हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला होता.त्या आधारे एटीएसच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दुकानावर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईल संच देखील तपासणीसाठी जप्त करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!