- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्या,मंगळवार १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत गडचिरोली-आरमोरी,चंद्रपूर,धानोरा व चामोर्शी या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या कालावधीत संबंधित मार्गावर दोन्ही बाजूंनी अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.मात्र रुग्णवाहिका,प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा,महावितरण,दुरसंचार व रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
सदर आदेशाचे काटेकोर पालन करावे,अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर भारतीय दंड संहिता १८६० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हादंडाधिकारी पंडा यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- Advertisement -

