Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीजागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली; दुर्गम भागातील वैद्य-पुजाऱ्यांचा ‘आरोग्य दूत’ म्हणून...

जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली; दुर्गम भागातील वैद्य-पुजाऱ्यांचा ‘आरोग्य दूत’ म्हणून पुढाकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” या ब्रीदवाक्याला अनुसरून जागतिक आरोग्य दिनानिमित्त गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली.सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथून काढण्यात आलेल्या भव्य आरोग्य जनजागृती रॅलीत अधिकारी-कर्मचारी,वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ तसेच दुर्गम भागातील पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दुर्गम भागातील गावांतून आलेल्या पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांचा सहभाग. जीवन पुंगाटी,रामा कुले,रामजी कुलेटी,डोलू तिम्मा आणि तोडसा पेठा परिसरातील प्रतिनिधींनी समाजाला अघोरी उपायांऐवजी शासकीय दवाखान्यात उपचार घेण्याचे आवाहन केले. “आजारी व्यक्तींना वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करा आणि विज्ञानाधारित उपचारांची निवड करा,” असा संदेश देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याची शपथ घेतली.या आरोग्य दूतांच्या पुढाकारामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासोबत आधुनिक उपचारांची स्वीकार्यता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी “माझं गाव,आरोग्य संपन्न गाव” हा लोकसहभागाचा मंत्र देत आरोग्य ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ व्हावी,यावर भर दिला.प्रत्येक नागरिकाने आरोग्याबाबत सजग राहून प्रशासनाला सहकार्य केल्यास गडचिरोली जिल्हा आरोग्य निर्देशांकात राज्यात अव्वल स्थान मिळवू शकतो,असे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक रचना लक्षात घेऊन पुजारी व पारंपरिक वैद्य यांना ‘आरोग्य दूत’ म्हणून संबोधण्याचा अभिनव दृष्टिकोन मांडला.समाजात त्यांच्या शब्दाला असलेला मान लक्षात घेता,त्यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे पोहोचू शकते,असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांवर भर देत लसीकरण, स्वच्छता आणि पोषक आहार यांचे महत्त्व पटवून दिले. “आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊच नये,यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी पारंपरिक श्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देण्याचे आवाहन केले.तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा कशा देत आहे,याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात वैद्य व पुजाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती पुस्तिका देऊन जनजागृतीसाठी प्रेरित करण्यात आले. उपस्थितांनी आरोग्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची सामूहिक शपथ घेतली.या उपक्रमामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार असून,लोकसहभागातून आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोटूळे,भीषक तज्ञ डॉ. मनीष मेश्राम,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे,तालुका आरोग्य अधिकारी धानोरा डॉ.पंकज हेमके, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश खोरगडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन राहुल कंकनालवार यांनी केले.विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!