- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-हिंस्त्र प्राणी मानवी वस्त्यांकडे शिकार शोधू लागल्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी उघडकीस आल्या आहेत.त्यांच्या क्षेत्रात गेल्यास हल्ला तर होतेच, पण आता आपली वस्ती सोडून दुसऱ्यांच्या वस्त्यात शिकार करणे,हे कितपत योग्य आहे; असे म्हणण्याची वेळ आली आहे.अश्याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची शहरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.बिबट्याने दोन वासरांवर हल्ला चढवल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही वासरांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,मंगळवारी एका वासरावर आणि काल शुक्रवारी परत एका वासरावर शहरातील वामन मोहुर्ले यांच्या घराजवळ बिबट्याने हल्ला चढवला होता.यात गंभीर जखमी झाल्याने दोन्ही वासरे मृत पावली.घटनेची माहिती मिळताच वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील पाहणी केली.दरम्यान,आढळलेल्या पाऊल खूनांवरून बिबट्याची करामत असल्याचा प्राथमिक अंदाज वनकर्मचाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.परिसरातील नागरिकांवर हल्ला चढवण्यापूर्विच वन विभागाने ठोस उपाययोजना करावी; अशी मागणी कोरची शहर वासियांनी केली आहे.
- Advertisement -

