Wednesday, June 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.....

चंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.. – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,मंगळवार ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण पहावयास मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचे काम तसेच अंधश्रध्देला खतपाणी घातले जात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने(अंनिस)ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही,असे असतांना देखील राष्ट्रीय वाहिन्या आणि सोशल मिडियावर सातत्याने ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. एका बाजूला चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणासंबंधी अंधश्रद्धांना बळी पडतो आहे.त्यामुळे,ग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात,डॉ.हमीद दाभोलकर,मिलिंद देशमुख,नंदिनीं जाधव,रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर,डॉ.अशोक कदम, मुंजाजी कांबळे,प्रकाश घादगिने,मुक्ता दाभोलकर,फारुख गवंडी प्रवीण देशमुख आदींनी केली आहे.चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे.त्यामध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात.दर सहा महिन्यानंतर पृथ्वी,चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.गर्भवती स्त्रीने झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे; असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!