- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्याच्या घडीला सर्वत्र मानव-वन्यजिव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.नागपूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो नागरिकांनी जीव गमावून कुणाचा आधारवड गेला तर,कुणाचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याचे चित्र आहे.अश्यातच काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना संरक्षण देण्या ऐवजी शेतात जाऊ नका,असा सल्ला देत आहेत. यावर शेतकरी संतप्त झाले आहेत.वनविभागाला पगार मिळतो आहे; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे?पिके वाळून जात आहेत.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आम्ही काय आता भीक मागायची कां?असा सवाल बसंती कोडवते आणि दुर्गेश कोडवते या शेतकरी मायलेकांनी उपस्थित केला आहे.नागपूर
जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघाने उच्छाद मांडला असून,नवेगाव येथील एका घटनेने शेतकरी हादरले आहेत.४७ वर्षीय बिरन मंगलू कोडवते यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने भीषण हल्ला केला.विशेष म्हणजे,वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात ठार केले.या घटनेमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघाच्या सततच्या वावरामुळे नवेगाव,वडंबा परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.यामुळे तूर,शेंगा यांसारखी उभी पिके वाळत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.पाण्याचे पाइप फुटले असून त्याची भरपाई देणार कोण?असा प्रश्न उभा ठाकला आहे.केवळ बैठकांचा फार्स न करता, वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी लालसिंग उईके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

