Friday, July 17, 2026
Homeनागपूरवनविभागाला पगार मिळतो; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे? - वाघाने...

वनविभागाला पगार मिळतो; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे? – वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्याच्या घडीला सर्वत्र मानव-वन्यजिव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.नागपूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो नागरिकांनी जीव गमावून कुणाचा आधारवड गेला तर,कुणाचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याचे चित्र आहे.अश्यातच काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना संरक्षण देण्या ऐवजी शेतात जाऊ नका,असा सल्ला देत आहेत. यावर शेतकरी संतप्त झाले आहेत.वनविभागाला पगार मिळतो आहे; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे?पिके वाळून जात आहेत.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आम्ही काय आता भीक मागायची कां?असा सवाल बसंती कोडवते आणि दुर्गेश कोडवते या शेतकरी मायलेकांनी उपस्थित केला आहे.नागपूर
जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघाने उच्छाद मांडला असून,नवेगाव येथील एका घटनेने शेतकरी हादरले आहेत.४७ वर्षीय बिरन मंगलू कोडवते यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने भीषण हल्ला केला.विशेष म्हणजे,वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात ठार केले.या घटनेमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघाच्या सततच्या वावरामुळे नवेगाव,वडंबा परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.यामुळे तूर,शेंगा यांसारखी उभी पिके वाळत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.पाण्याचे पाइप फुटले असून त्याची भरपाई देणार कोण?असा प्रश्न उभा ठाकला आहे.केवळ बैठकांचा फार्स न करता, वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी लालसिंग उईके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!