- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात येत्या,शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात,असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर २० फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्यात येणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन,पोलीस,कामगार,परिवहन,आरोग्य,शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातील
महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे,आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही.त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे.महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस,प्रशासन, विधी सल्लागार,समुपदेशक,जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते.यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचा काम आयोग करत आहे.आढावा बैठकीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या-त्या जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न,योजनांची अंमलबजावणी निर्देश देण्यात येतात.
- Advertisement -

