- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सन २०२५-२६ या हंगामासाठी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.तुरीची खरेदी ८ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने केली जाणार आहे.या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.सदरची खरेदी प्रक्रिया नाफेड(NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF)या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून त्यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.यावर्षी राज्यातील तूर उत्पादनाचा अंदाज १३.५१ लाख मेट्रिक टन इतका आहे.तसेच मागील हंगामात राज्यातील ८५ हजार शेतकऱ्यांकडून १३ लाख ३३ हजार १२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती.
तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी,अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.आवश्यकता भासल्यास राज्यातील शंभर टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल,असे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली.या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.
- Advertisement -

