- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मुलगा चुकीचे वागतो म्हणून चक्क आई-वडिलांनी आपल्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलाचे हात आणि पायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याची धक्कादायक तितकीच हादरवून टाकणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे.गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आई-वडील आपल्या पोटच्या गोळ्याला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हाता-पायाला जखमा झाल्या आहेत.मुलाचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात.घरात मोठे कुणीच नसल्याने दिवसभर मुलगा चुकीचे वागायला लागला होता.त्यामुळे आई-वडील कामासाठी घरातून जातांना त्याला साखळी व कुलपाने बांधून ठेवायचे आणि कामावरून आल्यानंतर त्याला मोकळे करायचे.या मुलाच्या संदर्भातील माहिती चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तेथे भयभीत अवस्थेत, वेदनेने थरथर कापणारा मुलगा आढळून आला. मुलाच्या हाता-पायांवर जखमांचे व्रण,चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती.लागलीच बाल संरक्षण पथकाने चिमुकल्याची सुटका केली.मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित बालगृहात दाखल करण्यात आले असून,मानसिक आघात दूर करण्यासाठी समुपदेशनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे.ज्या आई-वडिलांच्या कुशीत मुलाला सुरक्षिततेची भावना मिळायला हवी,त्याच कुशीतून क्रौर्याचे दर्शन घडल्याने सर्वजण अवाक् झालेत.याप्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून,पोलिस बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत पोलिस पुढील तपास करीत आहेत.सदरची कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण,संरक्षण अधिकारी साधना हटवार, कायदा व परीविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने व चाइल्ड लाइन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे यांनी केली.
- Advertisement -

