- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर-काटोल रोड चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण व्हावे,यासाठी दिनेश ठाकरे व सुमित बाबुटा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली.दरम्यान,याचिकाकर्त्यांचे वकील ॲड.महेश धात्रक यांनी मांडलेले मुद्दे व तीन सदस्यीय समितीच्या अहवालामधून महामार्ग प्राधिकरण दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले.प्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमान कारवाईची कारणे दाखवा नोटीस बजावून येत्या १६ जानेवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.त्यासोबतच महामार्ग प्राधिकरणचे जुने व नवीन प्रतिज्ञापत्र आणि विशेष समितीच्या अहवालाचा अभ्यास करून प्राधिकरणने कोणकोणती खोटी माहिती दिली,याचा तुलनात्मक तक्ता आज,बुधवार २४ डिसेंबरला सादर करा,असे निर्देशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले.महत्वाचे म्हणजे,२६ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने या रोडवर रेडियम बोर्ड व वळणमार्गाचे फलक लावण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर प्राधिकरणने एप्रिलमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे सांगितले होते; परंतु समितीच्या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आवश्यक सूचना फलक नसल्याचे दिसून आले.तसेच, नागपूर-फेटरी रोडचे कामही अपूर्ण असल्याचे आढळून आले.प्राधिकरणने ही दोन्ही कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल,अशी ग्वाही नवीन प्रतिज्ञापत्राद्वारे दिली; परंतु त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने प्राधिकरणद्वारे विविध मुद्द्यांवर केली गेलेली दिशाभूल लक्षात घेता सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
- Advertisement -

