Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न फसला; दोघेजण ताब्यात..

मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न फसला; दोघेजण ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती दिल्याने आज,मंगळवार २ डिसेंबर रोजी राज्यातील एकूण २८८ पैकी २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास दहा वर्षांच्या कालखंडानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये या निवडणूक प्रक्रियेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यातच विरोधकांनी सत्ताधारी पक्षांसह राज्य निवडणूक आयोगावर बोगस मतदानाचे आरोप केल्यामुळे राजकारण तापले आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात २ बोगस मतदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.हे  दोघेही दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न करत होते.पण,निवडणूक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि ते अलगद जाळ्यात अडकले.आज बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.त्यानंतर दीड तासातच प्रभाग क्रमांक-१५ मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला.त्यात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याच्या कोथळा येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला.पण,हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने हे मतदान टळले.त्याच्यासोबत अन्य एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.दुसरीकडे, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोथळी व इब्राहिपूर येथून अनेक लोक बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे.बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नाने आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!