Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीलोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे- जिल्हाधिकारी - मतदान केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी;...

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे- जिल्हाधिकारी – मतदान केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत आज,मंगळवार २ डिसेंबरला जिल्हाभरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.आज सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाची गती,सुविधा व व्यवस्थापनाची माहिती घेतांना त्यांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून मतदान हा लोकशाही उत्सव अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा,कारमेल हायस्कूल,पी.एम.श्री पंडीत जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा तसेच लांजेडा नगरपरिषद शाळा या मतदान केंद्रांना भेट दिली.प्रत्येक केंद्रावर मतदार यादी,मतदानाची टक्केवारी,ईव्हीएम मशीनची स्थिती,रांग व्यवस्थापन आणि मतदारांसाठी उपलब्ध सुविधा याची सविस्तर माहिती घेतली.
मतदानासाठी आलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये,यासाठी मूलभूत सुविधा,पिण्याचे पाणी,सावली, प्रवेशमार्ग नियमानुसार उपलब्ध आहेत की नाहीत,याची त्यांनी विशेष तपासणी केली. दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मतदानात प्राधान्य देण्याच्या सूचनादेखील त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिल्या.यावेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!