Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीशहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या...

शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या अनुदानात भेदभाव कां? नागरिकांचा रोष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके (संपादक)

गडचिरोली :- घरकूल योजनेसाठी शासनातर्फे शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.तर ग्रामीण भागासाठी १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची तुटपुंज्या अनुदाना अभावी थोडी-थोडी बांधकामे करून कितीतरी वर्षे बांधकामे पूर्ण करावी लागत असल्याने ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?असा सवाल ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

सध्याच्या घडीला बांधकाम साहित्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.जसे,रेती,सिमेंट,लोहा,गीट्टी,विटा व इतर साहित्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.अशातच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अल्पशा अनुदानात घरकूल बांधणे अवघड जात आहे.त्यामुळे काहीजण पैस्याअभावी सुरुवाती पासून अंथरूण पांघरूण पाय पसरवीत असल्याचे दिसून येत आहेत.’थेंबे थेंबे तळे साचे’ असे करतांना अनेक लाभार्थी दिसून येतात.मात्र अशाही स्थितीत लोकप्रतिनिधी चुप्पी साधून पोकळ बाता करण्याचे काम सुरू असल्याचे जनतेतून म्हटले जात आहे.

घरकुलाचे साहित्य घेतांना शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दर सारखेच लागत असतात.उलट ग्रामीण भागातील जनतेला शहरातून घरकुलाचे साहित्य आणावे लागत असल्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत असतात.मात्र शासनाला याची जाण आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.१ लाख ३० हजारामध्ये स्वतःसाठी शासनानेच घर बांधून दाखवावे असे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी म्हटले आहे.शासकीय बांधकामात ज्याठिकाणी २ लाखाचे काम असते; त्याठिकाणी ५ लाखाचे काम केले जाते.तर मग ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? त्यासाठी सरसकट ग्रामीण व शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे; अशी मागणी सर्वच स्तरातील घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!