- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात काही नक्षलवादी दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाकडून शोधमोहीम राबवित असतांनाच नक्षलवाद्यांनी बेछुटपणे अंधाधुंद गोळीबार केला.यात मध्यप्रदेश हॉकफोर्सचे पीएसआय(पोलीस उपनिरिक्षक)आशिष शर्मा यांच्या हात,पाय व पोटावर गोळ्या लागल्याने लगेच त्यांना डोंगरगढ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.४० वर्षीय आशिष शर्मा हे मध्यप्रदेशातील नरसिंहपुर जिल्ह्यातील गाडरवारा तालुक्यातील बोहानी येथील रहिवासी आहेत. त्यांना यापुर्वी दोनवेळा भारत सरकारच्यावतीने वीरता पदक मिळाले आहे.शर्मा हे २०१६ मध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर म्हणून रुजू झाले होते.येत्या जानेवारी २०२६ मध्ये त्यांचे लग्न होणार होते.शर्मा यांनी फेबुवारी २०२५ मध्ये बालाघाट जिल्ह्यातील रोंढा जंगलात झालेल्या नक्षल चकमकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यात तीन महिला नक्षली ठार केले होते.काल बुधवारी महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि
छत्तीसगड सीमावर्ती भागातील जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड पोलिसांच्या वतीने सीमेवरील बोरतलाव भागाला लागून असलेल्या कांगुराच्या घनदाट जंगलात संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली होती.त्या मोहिमेचे नेतृत्व शर्मा करीत होते.दरम्यान, आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला.त्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना नक्षलवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात पोलीस उपनिरिक्षक शर्मा जखमी झाले.तेव्हा लगेच त्यांना डोंगरगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
- Advertisement -

