- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरुवातीला महाराष्ट्र राज्याच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ चे पहिले दोन श्लोक गायले जायचे.मात्र,आता राज्यातील सर्व शाळांना ‘वंदे मातरम’ पूर्ण स्वरूपात गाणे बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारने घेतला आहे. दिवंगत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या गाण्याच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आदेश जारी करण्यात आला आहे.आज,शुक्रवार ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी या गाण्याच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.या प्रसंगी,सर्व शाळा संपूर्ण वंदे मातरम् गीत गातील. यासोबतच,शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित प्रदर्शने आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत; जेणेकरून विद्यार्थ्यांना या राष्ट्रगीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व याबद्दल माहिती मिळू शकेल.३१ ऑक्टोंबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येईल,असेही सरकारने स्पष्ट केले आहे.या काळात ‘वंदे मातरम्’ हे संपूर्ण गीत गायले जाईल आणि एक प्रदर्शन आयोजित केले जाईल. सरकारने या निर्णयाबाबतच्या संदर्भ पत्राची प्रत शिक्षण विभागालाही पाठवली आहे.त्याचबरोबर,सर्व शैक्षणिक संस्थांना या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
- Advertisement -

