नागपूर :-तालुक्याच्या लाव्हा शिवार परिसरात खदाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.धीरज उर्फ छोटू सुधाकर नारनवरे वय १५ वर्षे व नैतिक विपीन वानखेडे वय १५ वर्षे अशी मृतकांची नावे असून दोघेही म्हाडा कॉलनी,गणेशनगर येथील रहिवासी होते.काल गुरुवारी दुपारी १२ वाजता वाडी परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी लाव्हा शिवारातील खदानीच्या पाण्यात गेले होते.तीन मित्र खदानीच्या काठावर बसलेले असतांना धीरज आणि नैतिक पाण्यात उतरले.पोहतांना धीरजचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडू लागला.त्याला वाचविण्याचा प्रयत्न नैतिकने केला,मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले.घटनास्थळी उपस्थित एका स्थानिक नागरिकाने धीरजला वाचविण्याचा प्रयत्न केला,पण तोपर्यंत उशीर झाला होता.सुमारे दीड वाजता घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.यावेळी एका इसमाच्या मदतीने धीरज याचा मृतदेह बाहेर काढून एमआयडीसी परिसरातील अमेरिकन ऑन्कॉलॉजी रुग्णालयात पाठविण्यात आला.नैतिकचा मृतदेह मात्र पाण्यात खोल गेला होता.वाडी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.खदानीत यापूर्वीही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती,ज्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता.अश्यातच पुन्हा जीवघेणी घटना घडल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय दोन मुलांचा बुडून मृत्यू..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

