- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. बुधवार ३० एप्रिल २०२५ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली होती.पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वंकष जाहीर केले होते.त्यानुसार आता गृह मंत्रालयाने आज,सोमवार १६ जून रोजी जातनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे.केंद्र सरकार दोन टप्प्यात जातनिहाय जनगणना करणार आहे.अधिसूचनेनुसार,पहिला टप्पा १ ऑक्टोंबर २०२६ पासून सुरू होईल.त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही चार राज्ये समाविष्ट आहेत.तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल.तत्पूर्वी काल रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १६ व्या जातनिहाय जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला.दर १० वर्षांनी जातनिहाय जनगणना केली जाते.२०११ मध्ये देशातील शेवटची जात जनगणना झाली होती. पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती,पण कोविड-१९ महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली व आता २०२६ ते २०२७ मध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.

- Advertisement -

