- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भामरागड तालुका मुख्यालयापासून २८ किलोमिटर अंतरावर असलेले कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव आहे.कवंडे जंगल परिसरात नुकतेच २३ मे २०२५ रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईदरम्यान दोन पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेचे सुस्पष्ट तपशील समजून घेण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये अधिकृत दंडाधिकारी चौकशी राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली यांच्या न्यायालयात जाहीर चौकशी करण्यात येत असून,या घटनेची साक्ष असणाऱ्या नागरिकांनी किंवा घटनेच्या अनुषंगाने कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या व्यक्तींनी लेखी स्वरूपात शपथपत्रासह आपले निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदनात प्रत्यक्षदर्शी अनुभव किंवा घटनेचे वर्णन, घटनेपूर्वी किंवा नंतर घडलेली संबंधित घडामोड, सरकारी किंवा इतर यंत्रणांचा सहभाग किंवा प्रतिक्रिया,या प्रकरणाशी संबंधित अन्य उपयुक्त माहिती आदी मुद्द्यांवर माहिती देणे अपेक्षित आहे.सदर निवेदन १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी, कार्यालयात सादर करावे,असे एटापल्लीचे उपविभागीय दंडाधिकारी नमन गोयल यांनी कळविले आहे.
- Advertisement -

