Monday, August 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअवकाळीचा फटका; आता कांदा रडवणार..

अवकाळीचा फटका; आता कांदा रडवणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपल्याने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून घेतला आहे.कांदा कापणीपूर्वी आलेल्या अवकाळीने संपूर्ण पीक नष्ट झाले आहे.अश्यातच पावसामुळे साठवणीच्या सोयीअभावी शेतात काढून ठेवलेला कांदाही खराब झाला.यामुळे हजारो टन कांदा सडून,कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आता येत्या काही दिवसांत कांदा महाग होऊन रडवणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय,ज्यांनी कांदा कापला मात्र साठवणुकीत खराब झाला,त्यांना प्रति क्विंटल २,००० रुपयांचे अनुदान मिळावे,असेही त्यांनी नमूद केले आहे.पत्रात म्हटले आहे की,६ मे पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव,नाशिक,धुळे, सोलापूर, बीड,पुणे,बुलढाणा, अकोला परभणी,जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे पीक कापणीपूर्वीच वाया गेले आहे.कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.मागणी कायम असतांना पुरवठा घटल्यास भाव वाढतात,हे अलीकडच्या वर्षांत वारंवार दिसून आले आहे.सध्यातरी या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!