- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
लातूर :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.अश्यातच आज,सोमवार २६ मे रोजी लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.त्यातच शेतातील मान्सून पूर्व मशागतीची व इतर कामे आज सोमवारी दुपारच्या सुमारास आठ मजूर करीत असतांनाच अचानकपणे पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आठही मजूर शिवारातील एका झाडाच्या आडोशाला गेले असता झाडावर वीज कोसळली.यात झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.यात
विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा जागीच मृत्यू झाला.
अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावातील आठ मजूर आज शेतात मान्सून पूर्व मशागतीची कामे आणि शेंगा वेचण्यासाठी गेले होते.कामे करीत असतांनाच पावसाला सुरुवात झाली.पावसापासून बचाव करण्यासाठी आठ शेतमजूर एका झाडाखाली थांबले. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली.या दुर्घटनेत विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.त्यांनी जखमी मजुरांची विचारपूस करून सर्वांना तातडीने पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे आदेश दिले.
- Advertisement -

