Saturday, June 13, 2026
Homeलातूरझाडाखाली थांबले आठ जण; तितक्यातच कोसळली वीज.. - वीज कोसळून दोघांचा मृत्यू...

झाडाखाली थांबले आठ जण; तितक्यातच कोसळली वीज.. – वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
लातूर :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.अश्यातच आज,सोमवार २६ मे रोजी लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.त्यातच शेतातील मान्सून पूर्व मशागतीची व इतर कामे आज सोमवारी दुपारच्या सुमारास आठ मजूर करीत असतांनाच अचानकपणे पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आठही मजूर शिवारातील एका झाडाच्या आडोशाला गेले असता झाडावर वीज कोसळली.यात झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.यात
विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा  जागीच मृत्यू झाला.
अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावातील आठ मजूर आज शेतात मान्सून पूर्व मशागतीची कामे आणि शेंगा वेचण्यासाठी गेले होते.कामे करीत असतांनाच  पावसाला सुरुवात झाली.पावसापासून बचाव करण्यासाठी आठ शेतमजूर एका झाडाखाली थांबले. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली.या दुर्घटनेत विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.त्यांनी जखमी मजुरांची विचारपूस करून  सर्वांना तातडीने पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!