- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना शासनाने १० एप्रिल २०२५ रोजी निलंबित केले.त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मान्यता दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अवैधपणे नियुक्त मुख्याध्यापक पराग नाना पुडके,
माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर,कनिष्ठ लिपिक सुरज नाईक यांना नागपूरच्या सदर पोलिसांनी अटक केली.न्यायालयाने त्यांना १६ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली.आरोपींना १६ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.त्यानुसार उल्हास नरड सह पाच आरोपींना काल,मंगळवारी २२ एप्रिलला शिक्षण शालार्थ आयडी विभागातील घोटाळ्यामध्ये नियमित जामीन नाकारण्यात आला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी)एस. एच.उके यांनी हा निर्णय दिला आहे.त्यांनी जामीन अर्जामध्ये ते निर्दोष असल्याचा आणि त्यांना या प्रकरणात फसविण्यात आल्याचा दावा केला होता. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असल्याने आरोपींना जामीन देण्यास नकार दिला. याशिवाय,आरोपींना जामीन दिल्यास तपासावर वाईट परिणाम पडण्याची शक्यताही विचारात घेण्यात आली.
शंकेची सुई अन् धागाच गवसला👇
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी ११ एप्रिल रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.मुन्ना वाघमारे हे २०१० पासून नानाजी पुडके शाळेत रंगरंगोटीचे काम करतात.काही महिन्यांपूर्वी ते केंद्रीय शासकीय शाळेत गेले असता तेथील शिक्षक कर्मचारी पराग नानाजी पुडके यांना चुकीच्या पद्धतीने मुख्याध्यापक बनविल्यासंदर्भात चर्चा करतांना दिसले.या बाबीची विस्तृत माहिती घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.याच पेंटर मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीवरुन नागपूर पोलिसांनी सुरुवातीला उल्हास नरड आणि पराग पुडके यांच्यावर गुन्हा दाखल केला.त्यानंतर सुरुवात ते शेवटच्या टोकावरील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
- Advertisement -

