- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे.राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री कलंकित असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे; पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे.असा घणाघात महायुती सरकारवर नाना पटोले यांनी आज केला.
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही,या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत. महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे.भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले आहे. सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे.राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज शनिवारी नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतांना राज्य सरकारवर शरसंधान केला.
- Advertisement -

