- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शेतकऱ्यांना वर्षाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येकी सहा हजार प्रमाणे एकूण १२ हजार रुपये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दिले जातात.अशातच आता १२ हजार ऐवजी वर्षाला १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल,सोमवारी २३ डिसेंबरला शेतकरी सन्मान दिनानिमित्त पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत असून,अडचणीच्या काळात बळीराजाला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात,तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे; तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे.त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे.
- Advertisement -

