- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून थंडीचा कडाकाही वाढल्याने गावखेड्यात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.जिल्ह्यात सध्या रात्री थंडी,पहाटे वारा आणि दुपारी ऊन असे वातावरण आहे.अशातच सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत सायंकाळी पाच वाजल्यापासून दाट धुके पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पहाटे तर धुक्याचे प्रमाण जास्त असते. पुढील एक-दोन दिवसांत जिल्ह्यात गारठा आणखीन वाढणार असल्याचे संकेत सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा वाढणार असल्याची शक्यता आहे.शेतपिकासाठी थंडी आवश्यक असते. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थंडीला सुरुवात झाली.त्यामुळे झाडांना पालवी आणि मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी तर वाढली; मात्र,कडाक्याच्या थंडीने उबदार कपडेही थंडगार पडू लागले आहेत.
- Advertisement -

