Thursday, July 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राज्यात राबविण्यात येणार-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...

१७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राज्यात राबविण्यात येणार-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात पोलिसांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.अशातच कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिस दलाला मोठ्या तणावाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे राज्यात १७ हजार पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे; अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दि.२७ फेब्रुवारी रोजी दिली.राज्याचा वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री पवार यांनी आज विधान सभेत सादर केला.यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.राज्यातील पर्यटक आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर,जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना दिली.

राज्यात नवीन सुक्ष्म व लघू उद्योग धोरण लागू केले जाणार आहे.दाओसमधील करारानुसार ३ लाख रुपयांची गुंतवणूक झाली असून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या मौजे वडज इथे शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे.यात वस्तुसंग्रहालय, शिवकालीन गाव,किल्ल्यांच्या प्रतिकृतींचा समावेश असेल,असे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!