- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यातील बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.अवकाळीच्या चपट्यात पिके येऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झालाय. अनेक भागात धानाच्या कळपा भिजून नासाडी झाली आहे.अश्यातच आता आणखी दोन ते तीन दिवस अस्मानी संकट ओढवणार असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्यातच आत्ताच काही वेळापूर्वी प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर (IMD) ने दिलेल्या इशारा नुसार पुढील येत्या दोन तासांत चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास हलक्यांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा व अमरावती जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वतःचा विजेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- Advertisement -

